जनजाती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा ठाम पाठिंबा; शासनाने संवेदनशीलतेने संवाद साधून तातडीने मार्ग काढावा

जनजाती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा ठाम पाठिंबा; शासनाने संवेदनशीलतेने संवाद साधून तातडीने मार्ग काढावा

पुणे : हडपसर-मांजरी येथे गेल्या पाच दिवसांपासून आपल्या विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी जनजाती विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)चा ठाम पाठिंबा असून, शासनाने या आंदोलनाकडे संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.

जनजाती विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण, वसतिगृह, सुविधा, सुरक्षितता, रोजगार तसेच विविध शासकीय धोरणांशी संबंधित प्रश्न शासनासमोर मांडले आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता शासनाने त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न हे त्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने केवळ प्रशासकीय पातळीवर त्याकडे न पाहता संवेदनशीलतेने त्यांची दखल घेतली पाहिजे.

दरम्यान, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांच्यासह अभाविपच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भूमिका जाणून घेत अभाविप त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. लवकरच आदिवासी विकास मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आंदोलनावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी अभाविपच्या वतीने पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. शासनाच्या संबंधित विभागाशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी अभाविप सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात उपोषण करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वी शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाने आंदोलनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी तातडीने चर्चा करावी आणि त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक व ठोस तोडगा काढावा.

अभाविप प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले की, जनजाती विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी अभाविप विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करेल, विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडून मूलभूत सोयीसुविधांसाठी आंदोलन, उपोषण करावे लागणे हे दुर्दैवी असून यावर सरकारने संवेदनशीलपणे विचार करणे गरजेचे आहे.”

See also  TRTI-BARTI विद्यार्थ्यांच्या आंदोनाला यश; विद्यार्थ्यांच्या दुहेरी प्रशिक्षण प्रवेशप्रश्नी विद्यापीठाची दोन सदस्यीय समिती
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!