NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अमळनेर / जळगाव प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. याच उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), जळगाव जिल्हा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी डी. ए. धनगर, भैय्यासाहेब मगर, पुष्पा भोजू पाटील, अनिता सौंदाणे, समाधान देविदास निकम आणि जावेद अख्तर शेख हबीब या कर्तृत्ववान शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रज्जाक शेख आणि संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून, भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजाचे शिल्पकार आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कार्याचा तसेच NSUIच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व संघटनात्मक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमास धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, पी. एस. बागुल, सत्तार तेली, प्रताप पाटील, गजेंद्र साळुंखे, एस. डी. देशमुख, उमेश संदानशिव, रोहिदास कपडे, रोहिदास दाजी, ताराचंद सूर्यवंशी, नरेश चव्हाण, भगवान संदानशिव, अजय भिल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि समाजनिर्मितीच्या कार्याचा सन्मान आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांचे NSUIच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.





